breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

लॉकडाऊनमुळे 12 कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार, केंद्र सरकाने मदत करावी – सोनिया गांधी

नवी दिल्ली | देशभरात कोरोना व्हायरसचं महासंकट वेगानं पसरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जवळपास अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत.

त्यामुळे देशातील 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या आणि कामगारांवर गदा आली आणि पोट कसं भरायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे अशा कुटुंबियांना केंद्र सरकारनं 7500 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. दरम्यान लॉकडाऊन संदर्भात बोलताना केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. केंद्र सरकारनं अधिक गांभीर्यानं सर्व गोष्टी घेणं आवश्यक आहे. केवळ कामगारच नाही तर अनेक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे सप्लाय चेनला अधिक चांगलं तयार करणं आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button