breaking-newsमहाराष्ट्र

दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई

तीन वर्षांपूर्वी २०१५ साली ट्रक अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ८७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाण्यातील मोटार अपघात दाव्याची सुनावणी करणाऱ्या लवादाने दिले आहेत. या अपघातात मरण पावलेल्या मदन भगत यांच्या कुटुंबाने लवादामध्ये याचिका दाखल केली. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे आयुष्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली होती.

कुटुंबाच्यावतीने युक्तीवाद करणाऱ्या वकीलांनी लवादाला सांगितले की, मदन भगत हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांना महिना ४५ हजार रुपये वेतन होते. अर्ज करणारे सर्व कायदेशीर वारस असून ते मदत भगत यांच्यावर अवलंबून होते.

५ ऑगस्ट २०१५ रोजी मदन भगत हे दुचाकीवरुन मुंब्रा बायपास ब्रिजवरुन रेतीबंदर रोडवरुन ठाण्याच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने मदन यांची दुचाकी आणि अन्य तीन गाडयांना धडक दिली. मदन आणि अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार जण जखमी झाले. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले.

या खटल्याच्या सुनावणीला ट्रक मालक हजर राहिला नाही. त्यामुळे लवादाने त्याला एक्सपार्टी बनवले. पण विमा कंपनीने हा खटला लढवला. अपघाताच्यावेळी ट्रककडे फिटनेस प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे पैस देण्याची आमची जबाबदारी नाही अशी विमा कंपनीची भूमिका होती. पण याचिकाकर्त्याला पैसे द्यावे लागतील ते तुम्ही ट्रक मालकाकडून वसूल करा असा निकाल लवादाने दिला. मृताच्या नातेवाईकांना वार्षिक ७.५ टक्के व्याजदराने रक्कमेचे वितरण करा असे निर्देश लवादाने दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button