breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लालू प्रसाद म्हणाले, आम्ही पान खायला थांबलो तर मोदींच्या सभेएवढी गर्दी जमते!
पाटना : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील नरेंद्र मोदींच्या आजच्या सभेची खिल्ली उडवली आहे. आम्ही पान खायला थांबलो तर त्यांच्या सभेएवढी गर्दी जमते, असेही ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींची रविवारी पाटण्याचा गांधी मैदानावर सभा झाली. याच सभेला जमलेल्या गर्दीवरून लालू प्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींना हा टोला लगावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोदी, नितीश कुमार आणि रामविलास पासवान बिहारमधील सभेसाठी झटत होते, असेही लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत, ‘जाओ रे मर्दों, और जतन करो, कैमरा थोड़ा और ज़ूम करवाओ’… असा टोला लगावला.
https://twitter.com/laluprasadrjd/status/1102104455762333696