ताज्या घडामोडी

मोदी सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरीत भाजपाचे बूथ निहाय “घर चलो अभियान”

पिंपरी (Pclive7.com):- गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरीत भाजपच्यावतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात घर चलो अभियानाचा संकल्प करण्यात आला. पिंपरी विधानसभा मतदार संघातील ३९९ बूथ निहाय हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी ३ बूथनिहाय कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली असून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आज मोहननगर येथील शिवपार्वती सभागृह याठिकाणी मोठ्या उत्साहात भाजपाचे संमेलन पार पडले.

यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, अभियान संयोजक विलास मडिगेरी, सरचिटणीस नामदेव ढाके, शितल शिंदे, संजय मंगोडेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, निलेश अष्टेकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, महिला सरचिटणीस कविता सरचिटणीस, तेजस्वीनी कदम, गणेश लंगोटे यांच्यासह ३९९ बुथ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी, शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी उपस्थितांना अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारने गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, अंतर्गत सुरक्षा, सांस्कृतिक उन्नती आणि जगामध्ये भारताचा गौरव वाढविण्यासह विकासाच्या सर्व आयामांवर अतुलनीय कार्य केले आहे. केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दि. ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये “घर चलो अभियान” बूथ पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार, पिंपरी विधानसभा मतदार संघातील ३९९ बूथ निहाय बूथ समिती आणि पन्ना प्रमुखांच्या कार्य निर्धारण आले आहे. यामध्ये, नागरिकांशी संवाद साधणे, नव मतदार बनविणे, व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणे, मतदार यादीचे निरीक्षण, नमो अॅप, सरल अॅप डाउनलोड करणे, विकसित भारताचे ब्रँड एंबेसडर बनविणे, तरुणांचे, व्यावसायिक, विद्यार्थी, खेळाडू यांचा सहभाग वाढवून नियमित बैठका घेवून मोदी सरकारच्या योजनांची माहिती पोहविण्यात येणार आहे.

दि. ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान घर चलो अभियान सुरू होणार असून या अभियानादरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते २४ तास बूथ स्तरावरील बैठकीपासून ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधतील. त्याद्वारे सरकारच्या योजनांची माहिती देखील नागरिकांना देतील. त्यानुसार, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथ वर कार्यकर्ते भेट देवून ते बूथ स्तरावरील बैठका घेवून २४ तासांच्या मुक्कामात नागरिकांसोबत संवाद साधतील, असे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button