breaking-newsआंतरराष्टीय
मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात पुन्हा सुरू
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिल्यानंतर आता पाकिस्तानात मुंबईवरील हल्ल्याचा खटला पुन्हा सुरू झाला आहे. १० वर्षानंतर पुन्हा या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २६/११च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच हा हल्ला केला होता, असं सांगतानाच या खटल्याची सुनावणी होण्यास झालेल्या दिरंगाईला पाकिस्तानी सरकार आणि सैन्याला शरीफ यांनी जबाबदार धरले होते. दरम्यान, २७ भारतीय साक्षीदारांच्या उपस्थितीबाबतची माहिती पुढच्या सुनावणीपर्यंत देण्यात यावी, असे आदेश पाकिस्तानी न्यायालयाने बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.