breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी उत्सव रद्द, जन्माष्टमी सोहळाही घरच्या घरी साजरा

मुंबई | दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. तथापि यावर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नाही. त्यामुळे यंदा दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे.

दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा केला जाणार आहे.

“सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसासाठी खाजगी गाड्या सोडण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी हंडी चांगल्या जल्लोशात साजरी करू”, असे मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संगीतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button