breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ : भाजपा नेत्या पंकजा मुंडे

औरंगाबाद । प्रतिनिधी

मी नाराज असल्याच्या चर्चा केवळ व्यर्थ आहेत. सगळेच माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. मी सर्व बळ लावण्यासाठी इथे आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांनी दिली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या (Aurangabad Graduate Constituency) निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर ( BJP candidate Shirish Boralkar files nomination) यांनी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना भाजपने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

‘त्या’ बैठकीला उपस्थितीची गरज नव्हती

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बीड जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौ-याकडे पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाटील यांनी जी बैठक घेतली त्यात माझ्या उपस्थितीची आवश्यकता नव्हती, ट्विट करत आपण मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे याआधीच सांगितल्याचे स्पष्ट केले हाेते. दरम्यान, ऊसतोड कामगार फक्त भाजपचे नाहीत, राष्ट्रीवादीचे आणि काँग्रेसचेही आहेत. ऊसतोड कामगारांची सेवा भाजप आमदार सुरेश धस करत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांच्या मतदारसंघात 40 ते 50 हजार ऊसतोड कामगार आहेत, त्यांची सेवा त्यांनी केली पाहिजे, असे मुंडे म्हणल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button