breaking-newsराष्ट्रिय

मायावतींनी लग्न करावं, म्हणजे कुटुंब काय असतं त्यांना समजेल-आठवले

मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मायावती यांनी लग्न केले तर त्या मोदींबाबत बोलू शकतात असंही आठवले यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील भेलुपूर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

ANI

@ANI

Union Minister Ramdas Athawale: Mayawati is making remarks about Modi Ji & his wife. She (Mayawati) is not married, she doesn’t know what a family is, had she been married she would have known how to handle a husband. We respect Mayawati, she should not make such statements.

366 people are talking about this

राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पत्नीला सोडलं, ते महिलांचा सन्मान कसा करणार? असा प्रश्न विचारत मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याच टीकेला रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लग्न झालं आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करायला नको होती असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button