मराठी भाषा प्रचिन आहे का, याचे पुरावे द्यावे लागणे ही दुर्दैवी बाब – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई | महाईन्यूज
मराठी भाषेचं भविष्यात काय होणार याची चिंता करण्याचं बिलकूल कारण नाही. मराठीचं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही. मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा विरोध नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूनही मराठीवर प्रेम करू शकतो. मराठी भाषा प्रचिन आहे का, याचे आज पुरावे द्यावे लागतात, ही दुर्दैवी बाब आहे, अशी भावना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री ठाकरे बोलताना म्हणाले की, बुधवारी जेव्हा विधान परिषदेत मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर झालं. त्यावेळी सभागृहात शांतता होती. त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल. हे सांगताना मला कुणाचा अपमान करायचा नाही, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
विधिमंडळात भाजपचे नेते सत्ताधारी शिवसेनेला कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांचा गौरव करणारा प्रस्ताव विधिमंडळात आणला होता. मात्र, तो फेटाळून लावला गेला. यावरून सभागृहात गदारोळ झाला. फडणवीस हे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे.