करीना आणि शाहिदचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणामुळे झालं ?
कधीकाळी कलाविश्वामध्ये लव्हबर्ड्स म्हणून शाहिद कपूर आणि करीना कपूरकडे पाहिलं जायचं. २००४ साली ‘फिदा’ चित्रपटातून या दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. मात्र . ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या नात्याला तडा केला. या दोघांनी विभक्त होणं पसंत केलं. त्यानंतर दोघांच्याही करीअरच्या आणि आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. आज शाहिदने मीरा राजपूतसोबत संसार थाटला आहे. तर करीनानेही अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं आहे. मात्र आजही करीना आणि शाहिदचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणामुळे झालं हे कोणाला माहित नाही.
बऱ्याच वेळा शाहिद आणि करीना उघड उघडपणे त्यांच्या ब्रेकअपविषयी बोलत असतात. मात्र या नात्यात नेमका दुरावा कोणत्या कारणामुळे आला हे कोणालाच कळू शकलं नाही. आज शाहिदचा वाढदिवस आहे. त्यामुळे जाणून घेऊयात त्याच्या ब्रेकअपविषयी.
२००४ मध्ये ‘फिदा’ या चित्रपटातून शाहिद आणि करीनाच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. दोघांची पहिल्यांदा या चित्रपटाच्या सेटवरच भेट झाली. या चित्रपटातून शाहिदला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तर त्यावेळी करीना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. असे असतानाही करीनानेच शाहिद कपूरला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने ही गोष्ट सांगितली होती. इतकंच नाही तर अनेक फोन आणि मॅसेज केल्यानंतर शाहिदने तिच्या प्रपोजलला होकार दिल्याचेही तिने सांगितले होते.