breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मजुरांच्या नातेवाइकांना बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत

पुणे – कोंढवा परिसरात भिंत कोसळल्याच्या घटनेची बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या भिंतीखाली मजूर दबले ते सगळेच मूळचे बिहारी होती. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील रहिवासी राहिलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना नितीश यांनी प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली. या घटनेत 15 मजुरांचा मृत्यू झाला. तसेच इतर काही मजूर गंभीर जखमी आहेत. त्या जखमी मजुरांना नितीश कुमारांनी 50 हजारांची भरपाई जाहीर केली आहे. ही संपूर्ण मदत मुख्यमंत्री बचत निधीतून केली जाणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यालयाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, पीडितांच्या कुटुंबियांना तातडीने ही मदत पुरविली जाणार आहे. तसेच जखमी मजुरांवर तातडीने आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. पुण्यातील या घटनेवर देशभरातून हळ-हळ व्यक्त केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या घनटेतील मृतांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने आधीच चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच शिवसेनेच्या वतीने अतिरिक्त एक-एक लाख रुपये देणार अशी घोषणा करण्यात आली.

दरम्यान, पुण्यातील महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळाचे काम थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या ठिकाणी आता पुन्हा काम सुरू होणार नाही असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button