मंत्री दिवाकर रावते, ‘रिक्षाचालकांचे गा-हाणे ऐकतच नाहीत’; गंभीर आरोप
- रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा सवाल
- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर केली टिका
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सरकारने रिक्षा परवाना खुला ठेवल्याने शहरात 7 हजारहून अधिक नवीन रिक्षा धावत आहेत. रिक्षासाठी नवीन रिक्षा स्टॅण्ड उभारण्याची गरज आहे. परंतु, पोलिसांकडून रिक्षा चालकांना स्टॅण्ड उपलब्ध करून देण्यास विरोध होत आहे. याबाबत रिक्षा चालकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना वेळ नाही. अशा परिस्थितीत रिक्षा चालकांनी आपले गा-हाणे कोणाकडे मांडायचे, असा सवाल महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली मंजुर शिल्प उद्यान याठिकाणी नविन रिक्षा स्टॅन्डचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय थोरात, पांचयत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, फारूक कुरेशी, आयफाज कुरेशी, निलेश खिलारे आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, परिवहन खात्याने रिक्षा परमिट खुले ठेवले आहे. तरुणांना रिक्षाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध आहे. या संधीचा फायदा करून घेण्यासाठी अनेक नवयुवकांनी रिक्षा घेतल्या आहेत. मात्र, हक्काचा व्यवसाय चालविण्यासाठी रिक्षा स्टॅण्ड उभारण्याची आवश्यकता आहे. परंतु, रिक्षा स्टॅण्ड उभा करण्यासाठी पोलिसांचा विरोध होत आहे. पोलिसांनी रिक्षा चालकांना सहाकार्य करायला हवे. तसेच, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा असताना त्यांच्याकडून वेळ दिला जात नाही.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी राजु शेख, विकास गायकवाड, धिरज कांबळे, विनोद वाघमारे, कालिदास भोसले, राजेंद्र कांबळे, संदीप भोसले, महेश गायकवाड, आकाश मोरे, शंकर मोरे, बालाजी उबाळे यांनी परिश्रम घेतले.