भारत सरकारने चीनच्या आणखी ४७ अॅपवर बंदी, पबजीवरही टांगती तलवार
मुंबई – भारत आणि चीनमधील संघर्षानंतर भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बंद केले. त्यानंतर आता आणखी ४७ अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅप क्लोनप्रमाणे काम करत होते. या बंदी घातलेल्या अॅपमध्ये पब्जी आणि अली एक्स्प्रेसचाही समावेश असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नवीन यादी तयार करण्यात येत आहे. या यादीत कोणते चिनी अॅप बंद करण्यात येतील याचा अभ्यास केला जात आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये अनेक गेमिंग अॅपचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतात प्रसिद्ध झालेले काही चिनी गेम्सवरही बंदी घातली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी 200 पेक्षा अधिक अॅपची यादी तयार केली जात आहे. ज्यामध्ये पब्जी आणि अली एक्सप्रेससारखे प्रसिद्ध अॅप आहेत. भारतात या अॅप्सचे कोटींमध्ये युझर्स आहेत.
हे चिनी अॅप भारतातील डेटा चीनसोबत शेअर करत आहेत आणि त्यामुळे सरकारी ऐजन्सीकडून या अॅपचे रिव्ह्यू केले जात आहे. सध्या सरकारकडून नवीन अॅपवर बंदी घालण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.