महाराष्ट्रमुंबई
भाडेकपातीनंतर ‘शिवनेरी’च्या प्रवाशी संख्येत वाढ
एस.टी. महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर सुरू केलेल्या ‘शिवनेरी’ बसच्या तिकिटात ८ जुलैपासून सरासरी ८० ते १०० रुपयांनी कपात करण्यात आली असून त्यानंतर आजतागायत ‘शिवनेरी’च्या प्रवाशी संख्येत प्रति फेरी तीन-चारप्रमाणे तब्बल ६० हजारांनी वाढ झाली आहे.
वाढलेले तिकीट दर आणि ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवेशी स्पर्धा यामुळे ‘शिवनेरी’च्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली होती. एसटीच्या वाहतूक विभागाने ‘शिवनेरी’च्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेत प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला एसटीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आणि ८ जुलैपासून ‘शिवनेरी’ची कमी दरातील सेवा मुंबई-पुण्याच्या विविध मार्गावर सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच शिवनेरीला चांगला प्रतिसाद मिळत गेला. मध्यंतरी पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेच्या अनियमित फेऱ्यांमुळे ‘शिवनेरी’ला प्रतिसाद मिळाला.