दिल्ली – भाजप सरकारचा ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’, असा नारा होता. पण आता ‘भाजपापासून मुलींना वाचवा’, असा नवा नारा देण्याची वेळ ओढावल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. सुरुवातीला ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’, असा सरकारचा नारा होता. पण आता ‘भाजपापासून मुलींना वाचवा’, असा नवा नारा देण्याची वेळ ओढावल्याची टीका त्यांनी केली.