breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भांडणाची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाची गळा चिरुन हत्या, 5 आरोपींना अटक

नालासोपारा: नालासोपाऱ्यात तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा गळा चिरुन हत्या करण्यात आलेली होती. यानंतर आरोपी फरार झालेले होते. याप्रकरणी तुलिंग पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्येचा छडा लावून 5 आरोपींना अटक केलेली आहे. पूर्वीच्या भांडणाची तक्रार का केली? याचा राग मनात धरुन या पाच जणांनी कट रचत 32 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची बाब उघड झालेली आहे. याबाबत तुलिंग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन 5 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. दीपक मोरे (25), अमित कुमार (22), निर्मळ खडका (19), प्रशांत खाटकर (19) आणि प्रणय खाटकर (19) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. तर सद्दाम सय्यद (32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यामधील मुख्य आरोपी दीपक मोरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे.

दीपक मोरेचे सदाम सय्यद याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर सय्यद याने मोरेविरोधात त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार का दाखल केली? याचा राग मनात धरून मोरे यांनी आपल्या इतर 4 साथीदारच्या मदतीने त्यांनी सय्यदच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार 5 सप्टेंबरला सद्दाम सय्यद याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर रिक्षातून त्याला वसईतील एव्हरशाईन परिसरातील रामरहिम नगर येथे नेण्यात आले व त्यानंतर त्याच्यावर तलवार, दांडूके, दगडाने वार करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर हे सर्व फरार झाले होते. या हत्येप्रकरणी तुलिंज पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवलेली आहे. तसेच याप्रकरणाचा अवघ्या 24 तासात पोलिसांना छडा लावला. तसेच याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button