breaking-newsताज्या घडामोडी
बेपत्ता असलेल्या विध्यार्थ्याचा मृतदेह कालव्यात सापडला
हिंगोली | वसमत शहरातील जयनगर भागातील इयत्ता दहावीमधील १६ वर्षीय विद्यार्थी मागील दोन दिवसापासून बेपत्ता होता. याबाबत पोलिसात नोंदही घेण्यात आली होती.
सदर विद्याथ्र्याचा मृतदेह गोविंदपुर शिवारातील कालव्याच्या पाण्यात शनिवारी आढळून आला.वसमत शहरातील जयनगर भागातील दिपक पांडोजी नरोटे (१६) हा विद्यार्थी दहावीमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन दिवसापासून तो अचानक बेपत्ता झाल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला. तो मिळून आला नसल्याने वसमत शहर पोलीस ठाण्यात दिपक बेपत्ता झाल्याबाबत नोंद घेण्यात आली.