breaking-newsताज्या घडामोडी

बीडमध्ये साईबाबांनी हातमागाच्या दुकानात काम केलं होतं…बीडही तीर्थस्थळ असून विकासासाठी शंभर कोटींचा मागणी…

साईबाबांच्या जन्मस्थानावरून पाथरी विरुद्ध शिर्डीकरांच्या वादानंतर या वादात आता बीडकरांनीही उडी घेतली आहे…एका पुराव्यांनुसार साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते. एवढंच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी हातमागाच्या दुकानात कामही केलं . त्यामुळे येथेही तीर्थस्थळ असून विकासासाठी शंभर कोटी देण्याची मागणी बीडकरांनी केली आहे.

साईबाबा 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती.. साईबाबांच्या जन्मास्थानासंदर्भात एकूण 27 पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्यातील एका पुराव्यांमध्ये साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते. त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते. या संदर्भातले पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्याचाच संदर्भ घेत आता बीडकर पुढे सरसावले आहेत. साईबाबांच्या प्रवासामध्ये बीड हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचे बीडकर सांगत आहेत…

साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून पाथरीकर आणि शिर्डीकरांमध्ये सुरु झालेल्या वादावर तोडगा निघत पडदा पडला होता.मात्र आता बीडकरांच्या या भुमिकेमुळे पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button