बाउंड्री वॉल बांधण्यावरुन गोंधळ, 4 हजारांच्या जमावाकडून विश्व भारती कॅम्पसची तोडफोड
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये विश्व भारती (शांती निकेतन) कॅम्पसमध्ये सोमवारी बाउंड्री वॉलवरुन जोरदार गोंधळ झाला. समजा कंटक पौष मेला ग्राउंडवर बाउंड्री वॉल बांधण्यावरुन विरोध करत होते. त्यांनी यूनिव्हर्सिटीच्या संपत्तीचे खूप नुकसान केले. सूत्रांनी सांगितल्यानुसार, यूनिव्हर्सिटीने पौष मेला ग्राउंडवर बाउंड्री वॉल बनवण्याचा निर्णय घेतला होता. या ठिकाणी दरवर्षी जत्रेचे आयोजन होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शांती निकेतनमध्ये कॅम्पसजवळ अंदाजे 4,000 एकत्र जमले आहेत. लोकांनी या ठिकाणी खुप तोडफोड करत, जेसीबीने यूनिव्हर्सिटीचे गेट तोडले. यादरम्यान डबराजपूरचे तृणमूल आमदार नरेश बाउरी उपस्थित होते. विद्यापीठ प्रशासनाने अद्याप यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. विश्व भारती एसएफआय लीडर सोमनाथ साऊने सांगितले की, 50 जणांनी यूनिव्हर्सिटीच्या सेंट्रल हॉलमध्ये आंदोलन केले. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हे लोक पौष मेला ग्राउंडमध्ये लोकांच्या येण्याचा विरोध करत होते. शनिवारी विश्व भारती यूनिव्हर्सिटीने मागील 100 वर्षांपासून होत असलेल्या पौष जत्रेला यावर्षी न करण्याचा निर्णय घेतला आहे.