breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई – राज्यात अलिकडेच जाहीर झालेल्या पोलीस भरतीचा जीआर रद्द करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. या भरतीला एसईबीसीचं आरक्षण गृहीत धरण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे मराठा संघटनांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यासाठी मराठा संघटना आक्रमकतेची भाषा करत होते.

वाचा :-मंत्री विजय वडेट्टीवार अडचणीत, गुन्हे लपवल्याचा आरोप

पोलीस भरतीसाठी चार जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेला जीआर अखेरीस रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला होता. तो निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button