breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय; 1-1 ने मालिकेत बरोबरी

पुणे : भारत विरूद्ध श्रीलंका टी-20 चा दुसरा सामना पुण्याच्या एमसीए मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकत श्रीलंकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. तिसरा टी-20 सामना 7 जानेवारीला खेळला जाणार आहे.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 206 धावांचा डोंगर उभारला. यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार लगावत 56 धावांची नाबाद खेळी केली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी साठी आलेल्या शनाकाने 20 चेंडूत अर्धशतक करत संघाची धावसंखेत मोठी भर घातली.
श्रीलंकेचे तगडे आव्हान घाटताना भारताची सुरूवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये तीन ओव्हरमध्ये भारताचे तीन गडी बाद झाले. भारताचा सलामीचे फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल 2 आणि 5 धावा करत तुबूत परतले. तर राहुल त्रिपाठी, कर्णधार हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा यांनी ही हवी तशी कामगिरी केली नाही. भारताचा डावखुरा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलने अर्धशतकिय पारी खेळत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. अखेर 20 षटकांत भारत 190 धावा करू शकल्याने सामना 16 धावांनी गमवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button