breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील धरण क्षेत्रांत दमदार पाऊस, उजनी धरणातील पाणीसाठा वाढला

सोलापूर – शुक्रवारी रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. यामुळे गेले अनेक दिवस धरणांची थांबलेली पाणी पातळी आता झपाट्याने पुढे सरकत आहे. महाराष्ट्राचे मुख्य समजले जाणारे उजनी धरण आता निगेटिव्ह मधून प्लसकडे वाटचाल करत आहे.

उणे 53 वर असलेले उजनी धरण कालच्या पावसामुळे आता उणे 47 वर येऊन ठेपले असून नीरा देवधर हे धरण प्लस 56 टक्के तर भाटघर धरण 52 टक्क्यांवर आले आहे. वीर धरण 68 टक्क्यांवर आले आहे. पावसाने ओढ दिल्याने धरण क्षेत्रात पाणी पातळी अतिशय कमी झाली होती. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता मात्र आता पावसामुळे धरण क्षेत्रात आकडेवारी मध्ये वाढ होताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button