breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘पीएम किसान योजना’ अंतर्गत दीड वर्षांत सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली। टीम ऑनलाईन
देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत गेल्या दीड वर्षांत तब्बल ७५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
तसेच, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना सुमारे २२ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.