breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष

पिंपरी / महाईन्यूज

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणुचा संसर्ग होऊ लागल्याने परदेशातून पिंपरी-चिंचवडमध्ये येणा-या नागरिकांना क्वारंटाईन ठेवून त्यांच्या तपासण्या करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका गांभिर्याने काम करत आहे. मात्र, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात केवळ 21 जणांवर कारवाई केल्याची नोंद आहे. नवीन विषाणुचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर पोलिसांनी कारवाई कडक करायला हवी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषाणूने आणखी हाहाकार पसरला आहे. त्यामुळे त्या शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याने परदेशातील प्रवाशांना राज्यात यायला बंदी घातली आहे. आलेच तर यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. मात्र, नुकतेच ब्रिटनमधून (युके) ११५ प्रवाशी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्या प्रवाशांचे पत्ते शोधून त्यांची तपासणी केली जात आहे. ११५ पैकी 85 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी वैद्यकीय विभागाने केली. त्यापैकी ७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना कोविड नसल्याचे निष्पन्न झाले. तर एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे. उर्वरित १५ अहवाल अजून येणे बाकी असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने जाहीर केली आहे.

यातील बाधित रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यास त्याच्यातील भयंकर विषाणुला शहरभर पसरायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी म्हणून राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. परंतु, यासह सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यातच पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा जोर ढिला झाल्यामुळे नागरिकांना आता भिती राहिली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. काल दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी अवघ्या 21 जणांवर कारवाई केली. कोरोनाच्या नव्या विषाणुची भिती पाहता कारवाईचा वचक वाढण्याची गरज आहे.

पोलिसांकडून कारवाईची बोळवन

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यांतर्गत 15 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ एकावरच कारवाई झाली आहे. निगडी 1, चाकण 1, वाकड 5, चिखली 1 अशा एकूण 24 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईने कासवगती धारण केल्यामुळे विषाणुचा फैलाव होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याचा फायदा घेऊन नागरिकांचा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क वाढल्यास धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कारवाईने जोर धरणे अत्यंत गरजेचे आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button