breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पांडवकडा धबधबा परिसरातून पाचजण वाहून गेले

नवी मुंबईतल्या पांडवकडा भागात असलेल्या धबधबा परिसरातून पाचजण वाहून गेल्याचं वृत्त आहे. यापैकी एकजण जिवंत आहे. बाकी चौघांपैकी एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. पांडवकडा भागात जाण्यास बंदी असूनही नियमांचे उल्लंघन करुन पर्यटक त्यांचा जीव धोक्यात घालतात हे या घटनेमुळे उघड झाले आहे.

खारघर आणि बेलापूरदरम्यान ज्या टेकडी असून या टेकडीला पांडवकडा असे संबोधले जाते. पावसाळ्यात या ठिकाणी खाली पावसाचे पाणी पडत असल्याने नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाचे हे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या ठिकाणच्या पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते. मात्र अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे आजही पाचजण वाहून गेले. ज्यापैकी एकाला वाचवण्यात आलं आहे. एका तरुणीचा मृतदेह मिळाला आहे तर इतर चौघांचा शोध सुरु आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button