breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत, संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई: ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधलेला आहे. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले आहेत. “पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारलेला आहे.

“मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कालच विचारलेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button