नेहरु, यशवंतराव ‘एलएसी’ वर गेले तसे मोदीही गेले; जवानांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
मुंबई । गलवान, पेंगोंग झील आणि लडाखमधील काही भागात भारत आणि चीन दरम्यान तणावाची स्थिती आहे. अचानक एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखचा दौरा करुन सैन्य दलाचे मनोधैर्य वाढवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीवर भाष्य केले आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर देशाच्या नेतृत्वाला पुढे येऊन लष्कराच्या जवानांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
शरद पवार पुढे म्हणाले की, 1962 मध्ये आपण जेव्हा युद्धात पराभूत झालो. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे एलएसीवर गेले आणि त्यांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. अगदी त्याचप्रमाणे सध्याच्या पंतप्रधानांनी केले आहे. जेव्हा कधी अशी स्थिती निर्माण होते. तेव्हा देशाच्या नेतृत्वाने पुढे येऊन सैनिकांना प्रोत्साहित केलेच पाहिजे.