नाहीतर मराठा आरक्षणावरुन दुसरं पानिपत होईल…शिवेंद्रराजेंचा इशारा
सातारा – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये सरकारविषयी नाराजी आहे. राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असंही आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी म्हटलं आहे.आ ज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही भूमिका मांडली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे, असं सांगत राज्य सरकारने एमपीएससीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सावधानतेचा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं नेहमी बोललं जातं. मराठा समाजातील असलेल्या दुफळी असल्यामुळे असं बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्रं आलं पाहिजे, असं सांगतानाच मी इथे राजे किंवा आमदार म्हणून आलो नाही. तर एक मराठा म्हणून या गोलमेज परिषदेला उपस्थित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं, असं नेहमी बोललं जातं. आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असं सांगतानाच यावेळी मात्र इतिहास तुम्हाला पुन्हा माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.