breaking-news

धक्कादायक! पतीचा अंत्यविधी उरकताच पत्नीनेही केली आत्महत्या

बीड | महाईन्यूज

पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे गुरुवारी सकाळी घडली. पतीच्या विरहात पत्नीने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (२२) व मीनाक्षी जाधव (२०) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता.

रणजित हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असल्याने दोघेही पती -पत्नी औरंगाबाद येथे भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी रणजितने औरंगाबादेत गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. रणजितच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असतानाच गुरुवारी सकाळी मीनाक्षीने आत्महत्या केली. चकलांबा ठाण्याचे सपोनि. विजय देशमुख, पोउपनि. बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी पंचनामा केला. नंतर मीनाक्षीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button