breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! आंबोली घाटात गाडी जळाली; महिलेचा दुर्दैवी अंत

सावंतवाडी।

आंबोली वरून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी व्हॅगनार कार अपघातग्रस्त झाल्यानंतर पेट घेतल्याने जळून खाक झाली. या गाडीमध्ये पती—पत्नी असे दोघे प्रवास करत होते. गाडीने पेट घेतल्यानंतर पतीने गाडीतून उडी घेतली. तर पत्नी सीटबेल्ट लावले असल्यामुळे तिला स्वत:चा प्राण वाचवता आला नाही.

गाडी संरक्षक धडकल्यानंतर पूर्णपणे जळून खाक झाली तत्पूर्वी या गाडीने चौकुळ कुंभवडे येतील सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धबधब्याच्या अलीकडे धडक दिली होती. या धडकेनंतर घाबरून पळून जात असताना गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. नाही तोपर्यंत चालत्या गाडीने पेट घेतला होता. या परिस्थितीत चालकाने गाडीच्या बाहेर उडी मारली . चालकही ही आगीच्या झपाटय़ात आला होता. गाडीतून उडी मारल्यानंतर गाडी समोरील संरक्षक कठडय़ाला जाऊन आदळली तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता. असे त्या वेळी समोरून येणऱ्या वाहनचालकांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button