द. आशियात दाट लाेकवस्तीच्या देशांत काेराेना संसर्गाची स्फाेटक स्थिती शक्य…
जिनेव्हा | दक्षिण आशियात कोरोना संसर्गात मोठी वाढ हाेण्याचा इशारा जागतिक आराेग्य संघटनेने (डब्ल्यूएचआे) दिला आहे. केवळ भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान तसेच अन्य दक्षिण आशियातील देशांमध्ये या महामारीचा माेठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही हे विशेष आहे. पण याचा अर्थ धोका टळला आहे असे नव्हे, असे आपत्कालीन आराेग्य कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रयान यांनी सांगितले. रयान म्हणाले, भारतात करण्यात आलेल्या उपाययाेजनांमुळे हा फैलाव हाेण्यास निश्चितपणे अटकाव झाला आहे. त्यामुळे भारतात आताही या रोगाच्या प्रसारात अनियंत्रित वाढ झालेली नाही. परंतु जाेखीम कायम आहे. संघटनेच्या मुख्य संशाेधक साैम्या स्वामिनाथन म्हणाल्या, भारतात रुग्णांची संख्या २.३६ लाखांवर गेली आहे. ही आकडेवारी माेठी वाटत असली तरी १३० काेटी लाेकसंख्येच्या या देशाच्या दृष्टीने ती अजूनही जास्त नाही. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचे काटेकाेरपणे पालन केले पाहिजे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गॅब्रियस म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीचा वेग वाढवून भारत कोरोनाशी अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकेल. ते म्हणाले की, केंद्र सरकारने १० काेटी गरीब कुटुंबांना वर्षाकाठी ५ लाख रुपयांची विनामूल्य आराेग्य सेवा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु त्यासाठी आराेग्य पायाभूत सुविधा भक्कम करावी लागेल.