breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘देशी दारूची दुकाने उघडी, पण मंदिरं बंद’, वारकरी संप्रदायातील महाराजांची टीका

अकोला |महाईन्यूज|

‘देशी दारूची दुकाने आज उघडी आहेत, पण मंदिरे बंद आहेत, हे सरकार हिरण्य कश्यपचं सरकार आहे,’ असं म्हणत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

येत्या 31 ऑगस्टला सरकारला जाग करण्यासाठी पंढरपूरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या पत्रकार परिषेदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरही उपस्तिथ होते.

वारकऱ्यांमध्ये आता महात्मा गांधी जिवंत झाले आहेत आणि ते 31 तारखेला आंदोलन करतील, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. ‘मी मुख्यमंत्री असतो तर कोरोना संपला असं जाहीर केलं असतं,’ असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button