देशात गेल्या २५ तासांत ९५,७३५ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – देशात गेल्या २५ तासांत ९५,७३५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ११७२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशात एकूण रुग्ण संख्या ही ४४,६५,८६४ इतकी झाली आहे. तरराज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान राज्यात २३,८१६ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज राज्यात २३,८१६ नवीन रुग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९,६७,३४९ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,५२,७३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज १३,९०६ रुग्ण बरे होऊन घरी परत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६,८६,४६२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ७०.९६ % एवढं झालं आहे.