breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘महाविकास आघाडीने आंदोलनासाठी पैसे देऊन गर्दी जमवली’

नगर |

मंत्री नवाब मलिक यांना अटक केली म्हणून नगरमध्ये करण्यात आलेले आंदोलन म्हणजे पैसे देऊन बोलावलेली गर्दी होती, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. जे चुकीचे करतात त्यांना शिक्षा होणारच आणि अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी जनता कधीही रस्त्यावर उतरणार नाही, जनता देशद्रोह्यांना पाठिंबा देणार नाही, असेही खासदार विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राज्य सरकारमधील मंत्र्यांना भ्रष्टाचार करण्यातून वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास वेळ मिळत नाही, असाही आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या विषयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. राज्य सरकार आरक्षणासाठी जे निर्णय घेईल त्याला आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकमुखी पाठिंबा राहील, असेही खासदार विखे म्हणाले. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण देणारी विखे कुटुंबीयांची एकमेव शिक्षण संस्था आहे. राज्य सरकारमधील इतर कोणत्याही मंत्र्यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची हिंमत दाखवली नाही. तेवढी नैतिकता त्यांच्यापाशी नाही, अशी टीका त्यांनी केली.

  • जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवून देऊ -विखे

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीने नगरमध्ये केलेल्या आंदोलनात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यात आम्ही भाजपचा करेक्टह्ण कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. यासंदर्भात बोलताना खासदार विखे म्हणाले,की ‘करेक्ट’ कार्यक्रम कोणाचा करायचा हे मंत्री ठरवू शकत नाही तर जनता ठरवते. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button