breaking-newsराष्ट्रिय

देशात गेल्या २४ तासांत २२,२५२ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशाने आता रशियाला मागे टाकत जगातील आकडेवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताने कोरोनारूग्णांचा ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे भारतापुढची चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या २४ तासांत देशात २२,२५२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख १९ हजार ६६५ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ४६७ लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या २ लाख ५९ हजार ५५७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ४ लाख ३९ हजार ९४८ रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो ६० टक्क्यांच्या वर गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button