breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू, महापौर, आयुक्ताच्या बैठकीत मोठा निर्णय

नागपूर | राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या शनिवार-रविवारी आणि पुढल्या आठवड्यात जनता कर्फ्यूचं नागरिकांना महापौर संदीप जोशी यांनी आवाहन केलं आहे. नागपूर महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हा निर्णय जाहीर केला आहे. या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसंच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील. शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 8 दिवसांतच नागपुरात कोरोनाचे 13608 नवे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे, 8 सप्टेंबरला एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 2205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 37 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. कोरोना चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. ते मार्च महिन्याच्या तुलनेत 10 पटीन तर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढलं आहे. त्यामुळे वाढत्या चाचण्यांसह नागपुरात रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तर्क मान्य केले तरी दर शंभर चाचण्यांमागे कोरोना बाधितांची संख्या वाढणे हे धोक्याची घंटा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button