breaking-newsराष्ट्रिय
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख ६ हजार ३४९ वर
२४ तासांत ५७,४६८ नवे रुग्ण
नवी दिल्ली – भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मागील २४ तासांत देशात ६१ हजार ४०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८३६ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ५७ हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३१ लाख ६ हजार ३४९ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ५७ हजार ५४२ इतका झाला आहे. तर आतापर्यंत २३ लाख ३८ हजार ३६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दरम्यान, देशातील कोविड रिकव्हरी रेट वाढून ७५ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. देशात दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही ५० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. रविवारी तब्बल ५६ हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले होते.