दुर्दैव ! अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
अंत्यसंस्काराहून परतताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हे कुटुंब बेळगावातील होते. कार कालव्यात कोसळून हा अपघात झाला. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून कारचालक बचावला आहे. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
हे कुटुंब गोकाक येथे अंत्यसंस्कारासाठी गेलं होतं. परतत असताना सौंदत्ती जवळील कडबी गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार कालव्यात जाऊन कोसळली. कालव्यात पाणी असल्या कारणाने कारमधील पाच जणांना धडपड करुनही आपला जीव वाचवता आला नाही. कारचालक मात्र दरवाजा उघडून पोहेत वरती आल्याने त्याचा जीव वाचला.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे फकिरप्पा पुजेरी, हनुमंत पुजेरी, लगमण्ण पुजेरी, पारव्वा पुजेरी आणि लक्ष्मी पुजेरी अशी आहेत. अपघातानंतर वाचलेल्या कारचालकाने ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली.