breaking-newsमहाराष्ट्र

तुळजापुरात बाल भिक्षामुक्त अभियान जनजागृती रॅलीस उत्स्फूर्त सहभाग

  • बालभिक्षामुक्त अभियान स्तुत्य उपक्रम
  • सभापती शिवाजी गायकवाड यांचे प्रतिपादन

तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी

तुळजाभवानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बालभिक्षेकरी असून त्यांच्या पालकांकडून सक्तीने हे काम करवून घेतले जाते, बालकामगार व भिक्षेकरी मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून अशा प्रवृत्तीला प्रतिबंध घालून त्यांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे, यासाठी शहरातील नागरिकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून बालभिक्षामुक्त अभियान स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड यांनीं केले.

तुळजापुर शहरातील शिक्षण बाह्य बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी व भवानी मंदिर परिसर बाल भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी जनजागृती काढण्यात आली. दिनांक १४ नोव्हेंबर सकाळी १० वाजता ही जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाद्वार चौक, आर्य चौक, तहसील कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

यावेळी तुळजापूर प. स. सभापती शिवाजी गायकवाड, आनंद कंदले, डॉ. सतिश महामुनी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले, किशोर गंगणे, अमर चोपदार, संजयकुमार बोंदर, इंद्रजीत साळुंके, गुलचंद व्यवहारे, अभिजित कदम, राजाभाऊ माने, दिपक महामुनी, पद्माकर मोकाशे, बाल कल्याण समितीच्या सदस्य कस्तुरबाई कारभारी, ऍड. क्रांती थीटे, महानंदा पैलवान, प्रभावती मार्डीकर, किरण चौधरी, अर्जुन साळुंखे, अनिल धोत्रे, पत्रकार संजय खुरुद, गुरुनाथ बडुरे, सचिन ताकमोघे, ज्ञानेश्वर गवळी, सोमनाथ बनसोडे, प्रमोद कावरे, सिध्दीक पटेल, अनिल आगलावे यांच्यासह तुळजाभवानी माध्यमिक शाळेचे नानासाहेब थोरात, संतोष शिंदे, सुरेखा राऊत, शिंदे हायस्कूलचे शिक्षक आदी उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button