breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ठाण्यात लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मनसेने पत्रकार परिषदेत चोपले

ठाण्यात लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. ‘गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. किती दिवस या लोकांना सहन करायचे ?. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा इशाराच मनसेने दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत घाण येते, अशा शब्दात मनसेने उत्तर भारतीयांवर टीका केली.

ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. स्थानिकांनी नराधमाला चोप दिला, मात्र तिथून हा नराधम पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. व्हिडिओच्या आधारे नराधमाचा शोध घेतला जात होता. सोमवारी ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी या व्हिडिओतील नराधमाला पत्रकार परिषदेत आणले. हा नराधम मूळचा बिहारचा आहे. त्याने यापूर्वीही ठाण्यात तीन लहान मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

अविनाश जाधव आणि मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतच त्या नराधमाला चोपले. त्याला पत्रकार परिषदेत माफी देखील मागायला लावली. ‘नवी मुंबई, मुंबई किंवा ठाणे या तिन्ही शहरांमधील लहान मुलींवर बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी हे उत्तर भारतीय आहेत. हे सत्य असून गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. अशा किती लोकांना सहन करायचे. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू. उत्तर भारतातून घाण मुंबईत येत आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर मनसेने त्या नराधमास पोलिसांच्या ताब्यात दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button