टीआरपीसाठी माध्यमांनी चुकीचे दाखविले – शरद पवार
मुंबई – पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरीक्त कुणी उमेदवार तुमच्याकडे नाही का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. यावेळी मी सांगितले ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू यांच्यासह बरेच नेते आहेत. असे उत्तर मी दिले. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मात्र टीआरपीसाठी चुकीचे छापण्यात आले. असा खुलासा पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. त्यानंतर माध्यांशी बोलतांना पवारांनी त्या विधानावरून स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले की, आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा असून, देशात स्थिर सरकार येणे गरजेचे आहे. मुंबईतल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत काळजी वाटत असली तरी मुंबईकर उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतील. माझ्यासाठी मावळ काय, बारातमी काय आणि मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मतदान करण्याची संधी मला मिळाल्याने मी आनंदी आहे, सुट्ट्या आहेत लोक बाहेर गेले आहेत असे म्हणतात. पण मला असे वाटते मुंबईकर मतदानात मागे राहणार नाहीत. यंदा लोक निर्णायक निर्णय घेतली, असेही पवार म्हणाले आहेत.
पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदावर भाष्य केले होते. पवारांना पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी व्यतिरीक्त दुसरे उमेदवार नाहीत का असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी पवारांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासह बरेच नेते आहेत. असे सांगितले होते. पवारांनी या तिन्ही नेत्यांना समर्थन दिले अशा बातम्या झळकल्या होत्या. याची काल दिवसभर चर्चा होती. मात्र आज पवारांनी सत्यता सांगितल्यामुळे त्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे.