breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चीनमध्ये अडकलेल्या अश्विनीला पृथ्वीराज ‘बाबांचा’ व्हॉट्सअप कॉल

मुंबई |महाईन्यूज|

भारत सरकारने चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवले आहे. मात्र, अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घरवापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. त्यातच, मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. अद्यापही 60 ते 70 जण वुहान या शहरात अडकल्याची माहिती पाटील यांनी दिली.

भारत सरकारच्या इंडिया इन चायना या ट्विटर हँडलवरुनही हुबेई आणि चीनमधील भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधत आहोत. पण, तत्पूर्वी आपणही प्रकृतीची काळजी घ्यावी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं अनुकरण करावे, असे आवाहन भारत सरकारने चीनमधील भारतीय नागरिकांना केलंय. भारत सरकारच्या या ट्विटर हँडलवर मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी कमेंट करुन आपली व्यथा मांडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button