breaking-newsपिंपरी / चिंचवड

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ, सासरच्या पाचजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून व लग्नात संसारोपयोगी वस्तू न आणल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 एप्रिल 2018 ते 4 फेब्रुवारी 2019 दरम्यान भोसरी येथील इंद्रायणी नगर येथे घडली.

निलेश सुरेश टाव्हरे (वय 35), कमल सुरेश टाव्हरे (वय 60), मनीषा पवळे (वय 42), उषा कड (वय 40), आशा सांडभोर (वय 38, सर्व रा. इंद्रायणी नगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितमहिलेचा निलेश याच्याशी 24 एप्रिल 2018 रोजी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर चार दिवसांपासून सासरच्या मंडळींनी लग्नात संसारोपयोगी वस्तू आणल्या नाहीत. तसेच, त्या बदल्यात माहेरहून दोन ते अडीच लाख रुपये देखील आणले नाहीत. ‘तू मला पसंद नाहीस, आईच्या आग्रहास्तव हे लग्न झाले आहे’. असे म्हणत विवाहितेचा छळ केला.

लग्नापूर्वी फिर्यादी महिला कामाला जात होत्या. ते पैसे साठवून का ठेवले नाहीत, लग्नापूर्वी काम केलेले पैसे घेऊन ये म्हणत महिलेला शिवीगाळ केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. पती निलेश याने कार घेण्यासाठी विवाहितेचे सात तोळे वजनाचे मंगळसूत्र काढून घेतले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button