breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत – देवेंद्र फडणवीस
मुंबई – मराठा आरक्षणाची आज (२० जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलली असुन ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारला कोंडीत पकडले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
”सरकार ठाम भूमिका मांडू शकत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेत आहे. सरकारच्या दोन मांडण्यामध्ये फरक आहे. यामुळे घोळ होत आहे. हे अतिशय वाईट प्रकारे हाताळले जात आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या मनात काय आहे? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.