breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक्रीवादळाचा कोकणाला तडाखा

अरबी समुद्रातील ‘कयार’ चक्रीवादळ तीव्र झाले असून त्याने शनिवारी कोकण किनारपट्टीला तडाखा दिल्याने काही ठिकाणी पडझड झाली. वादळामुळे मुंबईत तुरळक, तर कोकणासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाने मुंबईला वेठीस धरले नसले तरी शनिवारी दिवसभर मुंबईकरांनी पावसाळी हवा आणि कोंदट वातावरणाचा अनुभव घेतला. दुपारनंतर शहर आणि उपनगरात अंधारून आले होते. मात्र पाऊस तुरळक होता. मुंबईत शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत कुलाबा, दादर, वांद्रे, कांदिवली, मुलुंड आणि चेंबूर येथे १ ते ५ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे, ऐरोली, कोपरखैरणे, मुंब्रा येथेही ५ मिर्मीयत पाऊ स पडला. कुलाब्यात २.२ मिमी, तर सांताक्रूझमध्ये १.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button