breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

घडाळाच्या काट्यावर सगळ्यांची नजर, तासाभरात महाराष्ट्रासाठी मोठी बातमी

मुंबई:– महाराष्ट्रात सध्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे 5:30 वाजता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी 5:30 वाजता राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमिवर राजभवनावर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजभवनावर मोठा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजभवनावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यपालांनी राज्यात घटनेनुसार सरकार येणं शक्य नसल्याचा अहवाल पाठवला आहे. ही राष्ट्रपती राजवटीची शिफारस आहे. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधीचं निवेदन शेअर करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांनी शिफारस केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी काल रात्री निमंत्रित केलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा मुदत वाढवून मागितल्याची सूत्रांनी माहिती आहे. त्याला राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळेच राज्यपालांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केल्याचं म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button