breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं संकट, पंचगंगेने इशाऱ्याची पातळी ओलंडली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट दिसत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. पावसाचा जोर पाहता पंचगंगा यंदाही धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर गेली आहे. इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे.
मात्र कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्याने धाकधूक वाढू लागलेली आहे. पंचगंगा नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून 100 हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजच जिल्ह्यात दाखल होणार आहेत.