breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘कोणताही कायदा, आयोग किंवा अध्यादेश मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही’- ब्राह्मण महासंघ

पुणे |

पुणे : महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत ब्राह्मण महासंघाची प्रतिक्रिया आलेली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळणे जवळपास दुरापास्त असल्याचे म्हटलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे जवळपास दुरापास्त आहे. राजकीय संघटना, मराठा संघटनांचे नेते आणि अभ्यासकांना याची पुरेपूर जाणीव आहे.

मात्र, कोणीही तसे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत करत नाही, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केलेले आहे. कोणताही कायदा, आयोग, समिती किंवा अध्यादेश मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. उलट मराठा आरक्षण लागू होऊ शकत नाही असे अनेक नियम आणि कायदे आजही लागू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण योग्य असल्याचे म्हणत, मराठा समाजाला आरक्षणाच्या निकषांत बसवायचेच असेल तर ते फक्त आर्थिक आरक्षणाद्वारे शक्य होईल, असे दवे म्हणालेले आहेत.

वाचा- शेतकऱ्यांचे कृषी विधेयकाच्या विरोधात 30 व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरुच

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button