breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसच्या धोरणांमुळे देशाचा विनाश – मोदी

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद ३७० आणि कर्तारपूर मार्गिकेच्या प्रश्नांवरून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसची चुकीची धोरणे आणि रणनीती यामुळे देशाचा विनाश केल्याचे या वेळी मोदी म्हणाले.

अनुच्छेद ३७० चा मुद्दा उपस्थित करताना मोदी म्हणाले की, ही तात्पुरती तरतूद होती, मात्र ती ७० वर्षे कायम राहिली आणि काँग्रेसने त्याबाबत काहीही केले नाही. दिल्लीतील सरकार झोपेत असल्याने काश्मीरमधील स्थिती बिघडली. काँग्रेसची चुकीची धोरणे आणि रणनीती यामुळे देशाचा विनाश झाला, असेही पंतप्रधान म्हणाले. मात्र आता देश बदलला आहे, वेळ बदलली आहे, आता भारतीय आणि काश्मीरमधील जनता धोरणे ठरवतील, गेल्या ७० वर्षांत निष्पाप नागरिक, जवान बळी पडले तरीही काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले नाहीत, असेही ते म्हणाले. कर्तारपूर मार्गिकेबाबत मोदी म्हणाले की, मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाले असून केंद्र सरकार गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था करीत आहे. फाळणीच्या वेळी कर्तारपूर गुरुद्वारा भारतीय हद्दीत आणता आले नाही ही मोठी चूक होती, भक्त आपल्या गुरूपासून विभक्त होऊ नयेत याची खातरजमा करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नच केले नाहीत, असेही मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button