उशीर झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, पालकांशी घातली हुज्जात
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
परीक्षेला येण्यासाठी काही मिनिटं उशीर झाल्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमधील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला. पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता व्यवस्थापनातील काही कर्मचा-यांच्याकडून त्यांच्याशी हुज्जात घातल्याची माहिती मिळाली आहे.
इयत्ता दहावीचा CBSC पॅटर्नचा आज पेपर होता. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजता पोहोचायचे होते. मात्र, तीन विद्यार्थिनी नियोजित वेळेपेक्षा काही मिनिटं उशिरा पोचल्या. तेव्हा त्यांना पेपर देण्यास मज्जाव करण्यात आला. विद्यार्थ्यानी ही बाब आपल्या पालकांना कळवली. तेव्हा परीक्षा केंद्रापासून विद्यार्थी लांब राहतात. ते ठिकाण 15 ते 20 किलोमीटर असल्याने परीक्षा केंद्र दूर पडत असल्याने येताना अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे थोडा उशीर झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांच वर्ष वाया जाऊ नये, म्हणून विनंती पूर्वक परीक्षेला बसण्याची मागणी केली.
मात्र, केंद्रप्रमुखांनी ती मागणी फेटाळली आणि पालकांनाही बाहेर काढलं. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वारंवार सांगूनही घडल्या प्रकाराबाबत शाळा प्रशासनकडून कुणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.